Shree Gajanan Maharaj Stotra || श्री गजानन महाराज स्तोत्र ||

Shree Gajanan Maharaj Stotra

Shree Gajanan Maharaj Stotra स्तोत्र १ ते २५

हे सर्वाद्या सर्व शक्ती| हे जगदोद्वारा जगत्पति| साहय व्हावें सत्वरगती| या लेकरा कारणे||१||

जे जे काही ब्रम्हांडात | ते ते तुझे रूप सत्य |तुक्यापुढें नाही खचित | कोणाचीही प्रतिष्ठा||२||

तूं निरंजन निराकार | तूंच अवधूत दिगंबर| साकार रूप सर्वेश्वर| विश्वनाथ तूंच की ||३||

जे जे काही म्हणावें | तें तें तुझे रूप बरावें| दासगणुस आता पावे | हीच आहे याचना ||४||

तूंच काशी विश्वेश्वर| सोमनाथ बद्रि केदार | महंकाल तेवि ओंकार| तूंच की ते त्र्यंबकेश्वरा||५||

भीमाशंकरा मल्लिकार्जुन| नागनाथ पार्वतीरमण| श्री घृणेश्वर म्हणून | वेरुळं गावी तुचं की||६||

तूंच परळी वैजनाथ| निधीतटाला तूंच स्थित | रामेश्वर पार्वतीकांत| सर्व संकट निवारता||७||

हे कृपार्णवा नारायणा| महाविष्णो आनंदधना| हे शेषशायी परिपूर्णा| नरहरि वामना रघुपते||८||

तूं वृंदावनीं श्री हरी | तूं पांडुरंग पंढरपुरीं| व्यंकटेश तूं गिरीवरीं| पुरीमाजीं जगन्नाथे||९||

द्वारेसी नंदनंदन | नाम देती तुज कारण | जैसे भक्तांचे इच्छिल मन | तैसे तुज ठरवती||१०||

आता हे चंद्रभागातटविहारा| या गजानन स्तोत्रा साहय करा | हेंच मागें पसरूनि पदा| तुज विठ्ठले दासगणू||११||

गजानन जे स्वरूप कांही| तें तुक्याविण वेगळे नाही | दत्त भैरव मार्तड तेही | रूपें तुझीच अधोक्षजा||१२||

या सर्व स्वरूपांकारण| आदरे मी करी वंदन | माझे त्रिपात करा हरण| हेंच आहे मागणे||१३||

हें महालक्ष्मी कुलदेवते|कृपाकटाक्षें लेकरातें | पाही दासगणूतें| हीच तुजला प्रार्थना||१४||

आतां श्रीशंकराचार्य गुरुवर| तेवी नाथ मच्छिंदर| निवृत्तीदास ज्ञानेश्वर| समर्थ सज्जनगडीचे||१५||

हे तुकारामा महासंता| तुजलागी दंडवता| कारितों होई मला त्राता| नाहीं ऐसे म्हणूं नका ||१६||

हे शिडी कर बाबा साई | लेकरांसाठी धांव घेई| वामन शास्त्री माझे आई| माझी उपेक्षा करूं नका ||१७||

हे शेगांवीच्या गजानना|महासंत्ता आनंदघना|तुला येऊं दे काहीं करुणा| या अजाण दासगणूची||१८||

तुम्हां सर्वा प्रार्थून| स्तोत्र करितो हे लेखन | माक्या चित्तीं म्हणून | वास आपण करावा| |१९||

जे जे तुम्हीं वादवाल कांही| तेंच लिहीन काढलीं पाहीन| स्वतंत्रता मला नाही| मी पोषणा तुमचना असे||२०||

मघमांसी सप्तमीस| वाद्यपक्षी शेगांवात| तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष| पंथाचिया माझारी||२१||

उष्ट्या पत्रावळी शोधन | तुम्ही केल्या म्हणून | मिळालें की नामभिमान| पिसा पिसा ऐसें तुम्हा ||२२||

उगी न वाढावी महती | म्हणून ऐसी केली कृती| तुम्ही साच गुरुमूर्ती| लपून बसाया करणे ||२३||

परि विचारवंत जेइ ज्ञानी | तें तुम्हालागी पाहुनी| भ्रमा हातफळी देऊनी| पाय तुमचे वंदितात||२४||

बंकटलाल दामोदर | हे दोघे चतुर नर | भ्रमातें सारून दूर | शरण आले तुम्हांला||२५||

Shree Gajanan Maharaj Stotra स्तोत्र २६ ते ५०

बंकटलालचे सदनास | तुम्ही राहिला काही दिवस | तेथे जानराव देशमुखास| मरत असतां वांचविले||२६||

केवळ पाजुनियां तीर्था| आपुल्या पदीचे समर्था| तुजलागी दंडवता| असो आमुचा बरचेवर| |२७||

तुझिया लिलानिधीचा| नच लागे पार साचा| टीटवीने सागराचा अंत कसा घेववेल?||२८ ||

पितांबरा देऊन भोपळा | नाल्यास तुम्ही पाठविला| जल ते हो आणविण्यांला| तहान लागली म्हणून ||२९||

पितांबरासी बजाविंले | ओंजळीनें पाणी भले | न पाहिजेंतुवा भरले| या माझिया भोपळ्यांत||३०||

जलांत तुंबा बुडवावा| जलें पूर्ण भरून घ्यावा | आणि तोच मला आणून द्यावा |यांत अंतर करुं नको ||३१||

तुंबा बुडेल ऐसे पाणी| नव्हते नाल्यालागूनी| विश्वास ठेवलोनिया वचनीं| ऐसे केलें पितांबरे||३२||

नाल्याचिया जलास| तुंबा तो लावितां सरसी|आपोआप त्या ठायासी| भव्य खांच पडली की||३३||

तुंबा त्यात भरत आला| ऐशी तुझी अगाध लीला| ती साच वर्णण्याला| शेषही थकेल वाटते||३४||

सोमवारी प्रदोषांसी | बंकटलालच्या साधनरासी | भाविकां आपण व्योमकेशी| दिसतां महाराजा||३५||

यात नवल ना तिळभर| कां की तूंच शंकर रमावर | हे जेवढे चराचर |तेवढे तुम्हींच आहात की||३६||

तुझे स्वरूप यथातथ्य| मानवासीं नाहीं कळत| म्हणून म्हणती भ्रमांत|मायावध होऊनी||३७||

प्रातः कालाचे वेळीं| संपली होती दिवासही| जानकीराम देईना मुळीं| विस्तव तुमच्या चिलमिस||३८||

जानकीराम सोनार बागेसरीचा वैश्वानर| द्यावयासी कुरकुर| करुं लागला असे की||३९||

तें अंतज्ञानी जाणून| कौतुक दाविले करून | चिलीम विस्तवांवाचून| पेटूनिया दाविली ||४०||

सोनार विस्तव देण्यांला | नाहीं ऐसे वदला | म्हणूनिया येता झाला| राग भगवंताकारणे||४१||

चिंचवणे ते सोनाराचे| नासलें अक्षयतृतीयेचें| प्राणघातक किंड्यांचे| झालें त्यांत साम्राज्य ||४२||

अवघे टकामका पहाती| नाका पदर लावती | एकमेकां संगती | हें चिंचवणे खाऊ नका ||४३||

मग जानकीराम म्हणाला| साधुस वितव ना दिला | त्याचा हा प्रत्यय आला | धन्य धन्य हा गजानन||४४||

मग तत्काळ उठून वेगेसी | आला बंकटलाल सदनासी| हकीकत बंकटलालासी| सर्व केली निवेदन ||४५||

बंकटलालाचे वशिल्यानें| चरण धरिलें सोनारानें| अनन्यभाव भक्तीनें| गजाननाचे तेधवां||४६||

गुरुराया अंतर | मऊ आपले साचार| तेंच का हो केले कठोर | मजविषयीं समर्था||४७||

आता या चिंचवण्यासी |हात लावा पुण्यराशी | त्याविण मी सदनासी | न जाय येथून||४८||

ऐसी त्याची ऐकून गिरा| चिंचवण्याशी लाविले करा | चिंचवणें तेच झारा झरा| अमृताचा विबुधहो||४९||

यापरी जानकीराम शरण आला |अखेर आपुल्या पदाला|मुकिन चंदू कृतार्थ केला |खाऊन दोन कान्होले||५०||

Shree Gajanan Maharaj Stotra स्तोत्र क्र ५१ ते ७५

माधव नामें चिंचोलीचा| ब्राह्मण एक होता साचा| त्यास बोध अध्यात्माचा | तुम्हीच एक केलात ||५१||

भ्रांती त्याची उठविली| प्रपंच माया तोडिली| मोक्ष पर्वणी लाधली |तया माधवाकरणें||५२||

ऐसें आपलें महिमान| श्रेष्ठ आहे सर्वाहून| पदरी असल्या विपुल पुण्य| पाय तुझे सांपडती||५३||

वसंत पूजेकारण | घनपाठी ब्राह्मण| आणविलेत आपण | ऐनवेळीं तेधवा||५४||

बंकटलालें आपणांसी| नेलें खावया मक्यासी| आपुलिया मळ्यासी| अति आग्रह करुनी||५५||

मोहोळें होती मळ्यात| मधमाशांची भव्य सत्य | तीं पेटविता आगटीप्रत|उठतीं झालीं निजलीलें||५६||

मधमाशाशी पाहून | लोक करिती पलायन | भय जीवाचें दारूण | आहे की प्रत्येकाला ||५७||

तुम्ही मात्र निर्धास्त | बैसता झाला मळ्यांत| मधमाशा अतोनांत| बसल्या तुमच्या अंगावरी||५८||

लोक दुरून पहाती | परी न कोणाची होय छाती | तुम्हां सोडवया गुरुमूर्ती | मधमाशांच्या त्रासांतून||५९||

बंकटलाल दुःखी झाला | पाहुनी त्या माशांला| त्यांनी मात्र थोडा केला | प्रयत्न तुम्हा सोडवण्याचा ||६०||

कांही वेळ गेल्यावरी| तुम्हीच आज्ञा केली खरी|मधमाशांस जाया दूरी| तें अवघ्यांनी पहिलें ||६१||

आपुल्या आज्ञेनुसार | मधमाशा झाल्या दूर | बंकट म्हणे सोनार | आणावितों कांटे काढावया||६२||

कां कीं मधमाशांचे काटे | रुतले असतील मोठें| ते लपून बसती बेटे| स्वामी अवघ्या शरीरांत||६३||

म्हणून ते काढावया | सोनार आणवितो ये ठायां|आपण म्हणालात वाया| हा त्रास घेऊ नका||६४||

योगशास्त्र येतें मला |मी योगबलें कांट्याला| बाहेर काढतो त्याजला| सोनार कश्यास पाहिजे ||६५||

ऐसें वदुन कुंभक केला | तेधवा किं आपण भला | तेणें बाहेर कांट्याला| पडणें अवश्य झाले की||६६||

हे कौतुक सर्वांनी| पाहिलें त्या ठिकाणी| जो तो मनुष्य जोडी पाणी | स्वामी आपणांकारणे||६७||

आपण म्हणाला त्यावर| हे जीवांनो घटकाभर| बैसा या वृक्षावर| आतां कोणास चावूं नका||६८||

संकल्प बंकटलालाचा| पूर्ण करणें आहे साचा| सोहळा मका सेवण्याचा| निर्विघ्न त्याचा होऊ द्या||६९||

पहा माशा उठतां क्षणी| तुम्ही गेलात पळूनी| संकट येतां नाही कोणी |तारीता हे ध्यानी धरा||७०||

लाडू, पेढे खावयास लोक जमती विशेष| परी सहाय्य संकटास| कोणीही करीना||७१||

हें तत्व ध्यानी धरा | ईश्वरासी आपुला करा | म्हणजे सफल होऊ खरा | तुमचा की संसार||७२||

ऐसा उपदेश भक्तप्रती| साच केलात गुरुमूर्ती | एक्या मुखें करूं किती मी आपुलें वर्णन||७३||

कृष्णाजीचें मळ्यात | दांभिक गोसावी आले बहुत| जे होते सांगत | शुष्क वेदांत जगाला||७४||

त्या गोसाव्यांचा ब्रम्हगिरी| महंत आणीला वाटेवरी | जो त्या जळत्या पलंगावरी| तुम्हांजवळ ना बैसला||७५||

Shree Gajanan Maharaj Stotra स्तोत्र ७६ ते १००

चहूंकडून होता पेटला | तो अग्नी आपण शांत केला | तेणें त्या ब्रम्हगिरीला| कौतुक अती वाटले|| ७६||

सर्व अभिमान सोडून | आपणां तो आला शरण | अग्नीचे ते अग्निपण| चांदण्यांपरी केलें तुम्ही ||७७||

टाकळीकर हरिदासाचा| घोडा अती द्वाड साचा| तुम्ही हरविला तयाचा| द्वाडपणा तो क्षणात||७८||

घोडा आज्ञेंत वागला| तो सर्वांनी पाहिला | अशक्य काही आपणाला| नाही उरले जगांत||७९||

अडगांव अकोली गावांत| कावळे शिरतां भंडाऱ्यात| आपण पळविले क्षणांत| आज्ञा त्यासी करून||८०||

अजूनपर्यंत त्या ठायी| कावळा ये ना एकदाही| संत जे वदतील कांही|खोटे होय कोठून ||८१||

प्रखर असुनी उन्हाळा | निर्जनशा काननाला| ऐन दुपारचे समयाला | कौतुक केले अभिनव ||८२||

अकोलीच्या रानांत| सर्व्हे नंबर बावन्नात| एका शुष्क गर्दाडाप्रत| बनविली तुम्ही पुष्करिणि||८३||

भक्त आपुला पितांबर| कृपा होती त्याचेवर| तयाचाही अधिकार| थोर आपण बनविला||८४||

ज्योतीप्रत मिळाल्या ज्योत| भेद कांही ना तेथे उरत| खराच पितांबर पुण्यवंत| साक्षात्कारी जाहला||८५||

वठलेल्या आंब्याला| त्यांनी आणविला पाला| कोंडोली ग्रामाला| हे कृत्य झालें की||८६||

भीमा अमरजा संगमासी| क्षेत्र गाणगापुरासी | पर्णे फुटलीं टोणप्यासी |नरसिंह सरस्वती कृपेने ||८७||

तेंच कृत्य कोंडोलीतें | करविले पितांबरा हातें| आपणची गुरुमूर्ते| हे स्वामी समर्था||८८||

वद्य पक्षांत माघमासी| सोमवतीच्या पर्वासी| क्षेत्र ओंकारेश्वरासी| गेले असतां भक्त तुमचे ||८९||

तेथे महानदी नर्मदेंत| नौका फुटली अकस्मात| पाणी येऊं लागलें आंत| नांव बुडुं लागली ||९०||

त्या नौकेंत आपण होतां | म्हणून नर्मदा लावी हातां| फुटलेल्या ठायी तत्त्वतां| ऐसा प्रभाव आपला हो||९१||

नौका कांठास लाविली| नर्मदेनें आणून भली | आपणां वंदून गुप्त झाली | हें बहुतांनी पहिले ||९२||

त्र्यंबकपुत्र कवराचा| आपुला भक्त होता साचा| जो अभ्यास वैद्यकीचा| हैद्राबादी करत असे||९३||

त्याची कांदा भाकर | आपण केली गोड फार | पदार्थ सारुनियां दूर | इतरांनी आणलेले||९४||

जैसा द्वारकाधीश भगवान | कौरवांचे पक्वान्न|सांडुनिया भक्षण | करी विदुर कण्यांचे||९५||

तैसेच आपण केलें|कवराचें अन्न भक्षिलें| खऱ्या भक्तीचें भुकेले | आपण आहा महाराजा||९६||

सवडदाचा गंगाभारती| तया फुटली रक्तपिती| तो त्रासून जीवाप्रती| आला असतां आपणाकडे||९७||

लोक अवघे तिटकारा| करुं लागलें त्याचा खरा | कोणी न देती त्यास थारा| रोगभयें करून ||९८||

त्या गंगाभारतीस| येऊं न देती दर्शनास | कोणी आपल्या शेगांवास | ऐसी स्थिती जाहली||९९||

लोक म्हणती तयाप्रत | मिसळू नकोस लोकांत | त्रास न द्याया यत्किंचित| तूं समर्थाकारणें ||१००||

Shree Gajanan Maharaj Stotra स्तोत्र १०१ ते १२५

तो गोसावी एके दिवशी | आला आपल्या दर्शनासी| डोई ठेवतां पायासी| मारिले आपण तयाला||१०१||

थोबाड झोडिले दोन्हीं हातें| लाथ मारून कमरेंते| उलथून पाडीला रस्त्याते| थुंकून त्याच्या अंगावरी||१०२||

बेडका पडतां अंगावर| गंगाभारती हर्षला फार| म्हणे आतां होईल दूर |व्याधी माझी निःसंशय||१०३||

जो बेडका होता पडला| तोच त्यानें मलम केला | अवघ्या अंगास लावला | चोळचोळूनिया निज हातें||१०४||

ऐशा रिती सेवा करीत | राहिला गोसावी शेगांवात| तयाच्या महारोगाप्रत | आपण कीं हो निवटिलें ||१०५||

तुमच्या कृपेचिया पुढें| औषध काय बापुडे|अमृत तेंही फिके पडे| ऐसा महिमा अगाध||१०६||

कोणतेही संकट जरी | येऊन पडलें भक्तांवरी | ते निजकृपेने करतां दुरी| आपण साच दयाळा||१०७||

संकटी खंडू पाटलाप्रत | आपण देऊन कृपेचा हात | न्यायाधीशांचें कचेरीत | निर्दोष त्यांसी सोडिले ||१०८||

बाळकृष्ण रामदासी | होता बाळापुर ग्रामसी | त्या माघ वद्य नवमीसी| समर्थ दर्शन घडविले||१०९||

घटकेंत दिसावा गजानन| घटकेंत सूर्यजीपंत नंदन | घटकेंत भजन तें गणगण| घटकेंत जय जय रघुवीर असे||११०||

तेणें बाळकृष्ण घोटाळला| अखेर ओळखून आपणांला| समर्थ म्हणून नमस्कार केला | काय लीला वानुं ती ||१११||

संत अधिकारें समान| मुळीं तेथे अधिक न्यून| जैसें भक्तांचे इच्छी मन | तैशी रूपे दिसती तया ||११२||

गणेशदादा खापर्डे | उमरवतीचे गुहस्तबडे| कुपादृष्टीने त्यांकडे| पहिले आपण सर्वदा||११३||

या खापर्ड्याला वऱ्हाड प्रांती| अनभिषिक्त राजा बोलती | राष्ट्रोद्धार आमची तळमळ ती | होती खापर्ड्याकारणें||११४||

कोठे न आले अपयश त्याला | हा तुमच्या कृपेचा महिमा झाला | बाळ गंगाधर टिळकाला| तुम्हीच कृपा केलीत ||११५||

भगवंताने अर्जुनाला | भगवद्गीतेचा उपदेश केला| ज्या गीतेने जगाला | थक्क करून सोडिले||११६||

पार्थ देवाचा भक्त जरी | राहिला वनवासाभीतरी| बारा वर्ष कांतारी | ऐसें भागवत सांगते||११७||

भगवंताचा वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला| वनवास तो नाही चुकला | तैसेच झाले टिळकांचे||११८||

संतकृपा असून | शिक्षा झाली दारूण | ब्रह्मदेशीं नेऊन | मंडल्याशीं ठेवलें त्या||११९||

श्रोतें त्याच मंडाल्यांत| गीतारहस्य केला ग्रंथ | जो आबालवृद्वांप्रत | मान्य झाला सारखा ||१२०||

कोल्हटकरा हातें भला| आपण होता पाठविला| भाकरीच्या प्रसादाला| मुंबईत टिळकाकारणें||१२१||

फळ हें त्या प्रसादाचें| गीतारहस्य होय साचें| भाष्यकार गीतेचे| हे सहावे झाले की ||१२२||

पहिले शंकराचार्य गुरुवर| दुसरे रामानुजाचार्य थोर| मध्व,वल्लभ त्यानंतर| भाष्यकार जाहलें||१२३||

पांचवी ज्ञानेश्वर माऊली | भावार्थ दीपिका टीका केली |जी मस्तकी धारण केली | अवघ्या मुमुक्ष जनांनी||१२४||

ज्ञानेश्वरा नंतर| एक दोन टीकाकार| झाले परी ना आली सर | त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची ||१२५||

Shree Gajanan Maharaj Stotra स्तोत्र १२६ ते १५०

वामनची यथार्थदीपिका| तैसाच गीतार्णव देखा| हेहिं ग्रंथ भाविका| कांही अंशी पटले की ||१२६||

गीतेचा अर्थ कर्मपर | लावी बाळ गंगाधर| त्या टिळकांचा अधिकार | वानाया मी समर्थ नसे||१२७||

मागील टीका समयानुसार| अवतरल्या या भूमीवर| तैसाच आहे प्रकार | या गीतारहस्याचा||१२८||

त्या लोकमान्य टिळकांवरी| आपण कृपा केली खरी | म्हणून तयाचा झाला करी | गीतारहस्य महा ग्रंथ ||१२९||

खामगांवी डॉक्टर कवरा| तीर्थ आणि अंगारा | आपण नेऊन दिलांत खरा | ब्राह्मणाच्या वेषानें||१३०||

ज्यायोगें व्याधी त्याची | समूळ हरण झाली साची | तुम्ही काळजी भक्तांची | अहोरात्र वाहतसां ||१३१||

कन्या हळदी माळ्याची| बायजा नामें मुंडगांवची| ही तुमच्या कृपे जानीची |समता पावती झालीसे||१३२||

वरदहस्त बायाजाशिरीं|तुम्हीं ठेवितां निर्धारी | तीही झाली अधिकारी | केवळ तुमच्या कृपेने||१३३||

मुंडगावच्या पुंडलिकाला| होता जरी प्लेग झाला| तो येता दर्शनाला | व्याधी दुर्धर हरिली तुम्ही ||१३४||

सदभक्त बापुन्याप्रती |तुम्ही भेटविता रुक्मिणीपती| नाहीं अशक्य कोणती | गोष्ट आपणांकारणे ||१३५||

एकेवेळी आपणांला| गोपाळ बुटी घेऊन गेला | भोसल्याच्या नागपूराला| अती आग्रह करून ||१३६||

गोपाळ बुटी श्रीमंत भारी | हजारों पंक्ती त्यांचे घरीं| उठून लागल्या वरचेवरी| केवळ आपल्या प्रीत्यर्थ||१३७||

इकडे शेगांव सुनें पडलें| प्रेतवत् दिसूं लागलें| मुखीं तेज नाहीं उरलें| मुळींच पाटील मंडळीच्या||१३८||

शेगांवीचे पुष्कळ जण | आले नागपुरा जाऊन| परि न झालें दर्शन| समर्थांचे कोणाला||१३९||

चौक्या पहारे सभोंवार| कडेकोट होते फार | समर्थांच्या पायांवर| शीर ठेवणे मुश्किल झालें||१४०||

नागपुराहुन आपणाला | आणण्या हरि पाटील निघाला | दहा पांच संगतीला| भक्त घेऊन शेगांवचे||१४१||

आला सीता बर्डीसी| गोपाळ बुटीच्या सदनासी | तो तेथे दरापाशीं| शिपाई पाहिले दोन चार||१४२||

शिपायांनी पाटलाला | जरी होता अटकाव केला | परि तो न त्यांनी जुमानीला| बळकट होता म्हणून ||१४३||

हरि पाटील शिरला आंत| गडबड झाली तेथ बहुत | तुम्ही धावून त्याचा हात | धरिलात की प्रेमाने ||१४४||

जैसे वासरासी पहातां| गाय धावे पुण्यवंता| तैसेच तुम्ही समर्था| केलेंत घरी बुटीच्या||१४५||

गोपाळ बुटी धांवत आले| हरि पाटला विनविते झाले| पाटील माझें ऐकलें| पाहिजें तुम्ही थोडेसें||१४६||

भोजनोत्तर समर्थाला| जा घेऊन शेगांवला| तो आहे भक्तीस विकला | शेगांवकरांच्या निःसंशय||१४७||

सर्वांचे झाल्या भोजन | आपण निघाला तेथून | आशीर्वाद तो देऊन गोपाळ बुटीच्या कुटुंबाला ||१४८||

त्या पाटील हरिवरी| कृपा आपुली अत्यंत खरी | श्री कल्याणस्वामीपरी| सेवेस आपुल्या तत्पर जो ||१४९||

हरि पाटलाकारण| स्वामी तुमचे द्वयचरण| हेंच महानिधान| जोडलें ऐसें वाटतसे||१५०||

Shree Gajanan Maharaj Stotra श्लोक १५१ ते १७५

धार कल्याणचे रांगणाथ| आले तुम्हां भेटण्याप्रत| गुरुराया या शेगांवात| शेगांवचे भाग्य मोठे ||१५१||

श्रीवासुदेवानंद सरस्वती | जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती| ऐशा जगमान्य विभूती| आल्या आपल्या दर्शना ||१५२||

जरी आपण देह ठेविला| तरी पावतसा भाविकाला| याचा अनुभव रतनसाला| आला आहे दयानिधे||१५३||

रामचंद्र कृष्णाजी पाटील | भक्त तुमचा प्रेमळ | त्याची तुम्ही पुरविली आळ| गोसाव्याच्या रूपाने ||१५४||

तैसेच बोरीबंदरावरी| जांजळ जो कां लक्ष्मण हरी | त्याला भेट दिली खरी | परमहंसरूपानें||१५५||

तुमच्या लिलेच्या तो पार| कोणा न लागे तिळभर | मुंगी मेरूमांदार |आक्रमण कैशी करी ||१५६||

टिटवीच्याने सागर | शोषवेल का साचार | दासगणू हा लाचार | आहे सर्व बाजूने ||१५७||

आपली वर्णण्या लीला | महाकवीच पाहिजे झाला | मजसारख्या घुंगुरड्याला| ते साधणे कठीण ||१५८||

परि जो का असे परिस | तो सुवर्ण करी लोखंडास| उरवी न त्याच्या ठायी दोष | लोहपणाचा येतुला हो||१५९||

आपुली लीला कस्तुरी | मम वणी मृत्तिका खरी | परि मान पावेल भूमिवरी| सहवासें या कस्तुरीच्या||१६०||

माझें भाग्य धन्य धन्य| म्हणून तुमचे पहिले चरण | आतां न द्यावे लोटून| परत दासगणूला ||१६१||

सर्वदा सांभाळ माझा करा| दैन्यदुःखातें निवारा| भेटवा मशीं शारंगधरा| भक्त बापुन्याच्यापरी||१६२||

आपल्या कृपेकरून | सानंद राहो सदा मन | सर्वदा घडो हरीस्मरण| तैसीच संगत सज्जनांची||१६३||

अव्याहत वारी पंढरीची |मम करे व्हावी साची | आवड सगुण भक्तीची | चित्ता ठायीं असुं द्या||१६४||

अंत घडो गोदातीरीं |यावीण आशा नाहीं दुसरी|स्मृती राहो जागृत खरी | भजन हरींचें करावया||१६५||

भजन करितां मोक्ष घडो| देह गोदातीरीं पडो | सद्वत्कांसी स्नेहजडो|दासगणूचा सर्वदा ||१६६||

मागितले तें मला द्यावे| तैसे लोकांचेही पुरवावे| आर्त गुरुवरा मनोभावे| जे या स्तोत्रा पठतील ||१६७||

या स्तोत्राचा पाठ जेथ |भाव होईल तेथ तेथ| तेथें न राहो कदा दुरित| इतूलेही दयाळा||१६८||

स्तोत्रपठकां उत्तमगती |तैशी संतती संपत्ती| धर्मवासना त्याच्या चित्तीं| ठेवा जागृत निरंतर||१६९||

भूतबाधा भानामती | व्हावी न स्तोत्रपठकांप्रतीं | लौकिक त्याचा भुवरती| उत्तरोत्तर वाढवावा||१७०||

हे स्तोत्र ना अमृत| होईल अवघ्या भाविकांप्रत| येईल त्याची प्रचित| सद्वाव तो ठेविल्या||१७१||

मोठ्यानें करून गर्जना| बहावें साधू गजानना| शेगांवचा योगीराणा| सर्वदा पावो तुम्हांते||१७२||

सद्गुरूनें चित्तास | पहा माझ्या करुण वास | बोलविलें या स्तोत्रास | तुमच्या हिताकारणे||१७३||

यातें असत्य मानल्यास|सुखाचा तो होईल नाश | भोगीत राहाल संकटास|वरचेवर अभक्तीनें| |१७४||

अभक्ती ती दूर करा| गजाननाशी मुळी न विसरा| त्याच्या चरणीं भाव धरा | म्हणजे जन्म सफल होई ||१७५||

Shree Gajanan Maharaj Stotra स्तोत्र १७६ ते १८१

स्तोत्र पठकांची आपदा| निमेलकीं सर्वदा| दृढ चित्तीं धरा पदां| गजानन साधूच्या||१७६||

वाचें म्हणता गजानन| व्याधी जातील पळून | जैसे व्याघ्रा पाहून | कोल्हें लांडगे पळती की ||१७७||

स्तोत्रपठका भूमीवरी | कोणी न राहील पहा वैरी| अखेर मोक्ष त्याच्या करी| येई कीं निःसंशय||१७८||

शके अठराशे अडूसष्टात| श्री क्षेत्र शेगांवात| समाधीपुढे मंडपात| रचियेलें स्तोत्र पहा||१७९||

फाल्गुन वद्य एकादशी | मंगळवार होता त्या दिवशी | स्तोत्र गेले काळसासी | गजाननाच्या कृपेने ||१८०||

शांति शांति त्रिवार शांति| असो या स्तोत्राप्रती| स्वामी गजानन गुरुमूर्ती | आठवा म्हणे दासगणू ||१८१||

||श्री हरि हरार्पणमस्तु|| शुभं भवतु||

||इति श्री संत गजानन प्रार्थना स्तोत्र समाप्त||


Articles

Gurucharitra Adhyay 14 श्री गुरुचरित्र अध्याय १४ वा – सद्गुरूंच्या चमत्काराची अद्भुत गाथा

Hanuman Chalisa

Scroll to Top